67
जामनेर प्रतिनिधी तीन वेळा शेताची मोजणी करूनही न्याय मिळत नसल्यामुळे अखेर त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने महाराष्ट्र दिनी भूमी अभिलेख कार्यालयासमोर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मध्यस्थ केल्यामुळे अनर्थ टळला. बाबुराव पाटील राहणार खर्चाने या शेतकऱ्यांचे तीन वेळा शेत मोजणी करण्यात आली ात्र त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे त्यांनी आज भूमी अभिलेख अधिकार्यासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी अधिकाऱ्यांनी दिनांक नऊ मे रोजी पुन्हा शेत मोजणी करण्याचे आदेश दिले आहे सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आता तरी शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी रास्त मागणी होत आहे.